शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

केवळ पोपटपंची करून विकास होत नाही अजित पवार; चाफळमध्ये विक्रमसिंह पाटणकरांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:08 IST

चाफळ : ‘विधानसभेच्या पराभवाची पाटणकरांची खंत २०१९ मध्ये भरून काढण्याची तयारी केली आहे. नुसती पोपटपंची करून विकास होत नाही.

चाफळ : ‘विधानसभेच्या पराभवाची पाटणकरांची खंत २०१९ मध्ये भरून काढण्याची तयारी केली आहे. नुसती पोपटपंची करून विकास होत नाही. त्यासाठी धमक असावी लागते. ती धमक पाटणच्या विद्यमान आमदारांकडे नाही,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

चाफळ येथे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृत महोत्सव वर्ष प्रारंभप्रसंगी बुधवारी मेळावा पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते. ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार नरेंद्र पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घाडगे, सारंग पाटील, वसंतराव मानकुमरे, राजेश पाटील, सुजित पाटील, सभापती उज्ज्वला जाधव, बाजार समितीचे उपसभापती दादासाहेब यादव उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, ‘दुर्गम पाटण तालुक्यातील गावागावांत विकासाची गंगा पाटणकरांनी पोहोचवली. राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.’विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘तरुणांनी फसवणाºयांच्या मागे न लागता राष्ट्रवादीची ताकद मजबूत करून २०१९ ची तयारी अशी करा की विरोधकाला थेट साताºयाच्या घरी पाठवण्याची सोय होईल.’सत्यजित पाटणकर, आमदार नरेंद्र पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. विक्रमसिंह पाटणकर यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन प्रा. दीपक डांगे- पाटील यांनी केले. रुपाली पाटील, चंद्रकांत देशमुख, शिवाजीराव पाटील, सरपंच विनोद कदम यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती व सरपंच, सदस्य उपस्थित होते. सभापती राजेश पवार यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब यादव यांनी आभार मानले.रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसादचाफळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यानिमित्त निसरे फाटा ते चाफळपर्यंत भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये तरुणांसह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी तरुणांच्या घोषणाबाजीने संपूर्ण चाफळ परिसर दणाणून गेला होता.जनतेला देशोधडीला लावण्याचे काम!राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जिवाभावाचे सहकारी म्हणून विक्रमसिंह पाटणकर यांची संपूर्ण राज्यात ओळख आहे. महापुरुषांची नावे घेऊन भावनिक राजकारण करणारा भाजप हा जातीयवादी पक्ष सामान्य जनतेला न्याय देणार नाही. राज्यावर कर्ज करणाºया या भाजप सरकारला हाकलून देण्याची वेळ आली आहे. राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार केवळ सामान्य जनतेला देशोधडीला लावण्याचे काम करत आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याची दुर्दशा झाली आहे, अशी टिका अजित पवार यांनी केली.फडणवीस नव्हे ‘फसवणूक’ सरकार !सध्याचे भाजप, शिवसेना सरकार शेतकºयांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांची उघडपणे फसवणूक करीत आहे. हे फडणवीस नव्हे तर ‘फसवणूक सरकार’ आहे. भाजप, शिवसेना शासनाला पश्चिम महाराष्ट्राची अ‍ॅलर्जी झाली असल्यामुळेच जनहिताच्या प्रकल्पांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे.सध्याच्या शासनकर्त्यांना सत्तेची धुंदी चढली आहे. ती धुंदी लवकरच उतरेल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSatara areaसातारा परिसरPoliticsराजकारण